राजकारण

Raj Thackeray : महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी फोडाफोडीचे राजकारण केलं

Published by : Siddhi Naringrekar

नागपूरमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे म्हणाले की, जातीयवाद, पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण या सगळ्या गोष्टींना कारणीभूत फक्त एकटं शरद पवार आहेत.

महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी फोडाफोडीचे राजकारण केलं. कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली. जातीचं विष देखिल शरद पवार यांनी कालवलं. या सगळ्या गोष्टी ज्या सुरु झाल्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरु झाल्या.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, असे महाराष्ट्र याच्याअगोदर कधीच नव्हता. हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे. हा विषय फक्त काय राजकारण, विधानसभा, लोकसभापुरता राहिला नाही हा घराघरात शिरलेला विषय आहे. असे राज ठाकरे म्हणाले.

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल

वंचितची विधानसभेची पहिली यादी जाहीर; पहिल्या यादीत 11 उमेदवारांचा समावेश

Navra Majha Navsacha 2: "नवरा माझा नवसाचा 2" पहिल्याच दिवशी बाप्पाने दिला कौल! पहिल्या दिवशी केली 'एवढी' कमाई

Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड