Gulabrao Patil Team Lokshahi
राजकारण

"55 मधले 40 आमदार फुटले म्हणजे तुमच्यात काहीतरी कमतरता आहे" गुलाबराव पाटलांचा घणाघात

Published by : Vikrant Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यादरम्यान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणापुर्वी भाषण केलं. त्यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर त्यांनी निशाणा साधला.

काय म्हणाले पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील?

  • आम्ही गद्दारी केली नाही

  • शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले

  • धर्मवीर आनंद दिघे व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्ता पालटली

  • आमच्यावर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा

  • 55 मधले 40 आमदार फुटले म्हणजे तुमच्यात काहीतरी कमतरता आहे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांमधील संघर्ष चांगलाच शिगेला गेला आहे. आता गुलाबराव पाटलांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंच्या गटाकडून काय प्रत्युत्तर मिळतं हे पाहणं गरजेचं आहे.

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स