Eknath Shinde Team Lokshahi
राजकारण

"येवढं मोठं परिवर्तन राज्यात कधी झालं नाही आणि होणारही नाही" मुख्यमंत्र्यांचं विधान

Published by : Vikrant Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नंदुरबार दौऱ्यावर आहेत. नंदुरबार दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना अनेक मोठ्या निर्णयांचा उल्लेख केला. तर, त्यांनी पुन्हा एकदा 'हे जनतेचं सरकार असल्याचं म्हटलंय.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

  • आम्ही शिवसेना वाचवण्याच्या भुमिकेतून पुढे आलोय

  • येवढं मोठं परिवर्तन राज्यात कधी झालं नाही आणि होणारही नाही

  • आम्ही अनेक ठिकाणी मेळावे, सभा घेतल्या सभांना उत्स्फुर्त गर्दी आहे

  • हे लोकांच्या मनातलं सरकार आहे

  • आम्ही सण-उत्सव पुन्हा सुरू केले

  • गेल्या अडीच वर्षांत अनेक विकासकामं थांबली होती

  • आम्ही पुन्हा प्रकल्प सुरू केले

  • आम्ही आतापर्यंत 72 मोठे निर्णय घेतलं.

  • NDRF च्या दुप्पट मदत आम्ही दिली

  • निकषांत न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा निर्णय घेतला

  • 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत एस टी प्रवास दिला

दरम्यान, या भाषणात मुख्यमंत्र्यांनी जरी शेतकऱ्यांना केलेल्या मदतीचा उल्लेख केला असला तरी विरोधकांकडून ही मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळालीच नसल्याचं म्हटलं जातंय

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...

Metro 3: मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ऑक्टोबरमध्ये