मुंबई: पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु असून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अशात, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना अंबादास दानवेंनी विविध मुद्यांवर भाष्य केले. सरकार राजकीय टोमणेबाजीत व्यस्त असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.