बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता. यावर रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आज रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या @RRPSpeaks ह्यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा पुन्हा एकदा गैरवापर! ही लढाई आता सत्यमेव जयते विरुद्ध सत्तामेव जयते अशी आहे! अंतिम विजय सत्याचाच असणार! असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.