महाराष्ट्र

धानाच्या पुंजन्यला आग, आगीत संपूर्ण धान जळून खाक

Published by : Lokshahi News

उदय चक्रधर, गोंदीया
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील हरदोली गावात शेतकऱ्यांच्या धानाच्या पुजण्याला आज लागून संपूर्ण धन जळून खाक झाले आहे.

हरदोली येथील शंकर बिसने यांनी हलक्या वाणाची धान कापणी करून शेतातच पुंजना (ढीग) तयार करून ठेवला होता. गुरूवारी दुपारच्या सुमारास अचानक पुंजण्याला आग लागली. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण धान्य जळून खाक झाले. या मुळे शंकर यांना लाखो रुपयाचं नुकसान झाले असून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

सध्याची राज्यातली परिस्थीती शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना अशी आहे. परिणामी अतिवृष्टी, कर्जाचा डोंगर, सरकार आणि विमा कंपन्यांकडून दुर्लक्ष, या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक आणि मानसिक हेळसांड सहन करावी लागत आहे.

VidhanSabha Elections UBT: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले! छत्रपती संभाजी नगरसाठी "या" उमेदवारांची नावे आली समोर...

VidhanSabha Elections UBT: ठाकरे गटाकडून अजित पवारांना मोठा धक्का!ठाकरे गटात इनकमिंगला सुरुवात

Satish Chavan: आमदार सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीमधून 6 वर्षासाठी निलंबन

Sharad Pawar VidhanSabha Elections: इंदापुरात शरद पवारांना धक्का! इंदापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार...

मविआच्या मतदारांची नावे यादीतून वगळली- नाना पटोलेंचा गंभीर आरोप