महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यातही महापुराचा धोका कायम; वारणा नदीकाठच्या गावांना पुराचा विळखा

Published by : Siddhi Naringrekar

सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. सांगली जिल्ह्यातही महापुराचा धोका कायम असल्याचे पाहायला मिळत असून वारणा नदीकाठच्या गावांना पुराचा विळखा घातला आहे. कणेगाव, भरतवाडी गावात पुराचं पाणी शिरलं आहे.

चांदोली धरणातून वारणा नदीत विसर्ग सुरू असल्याने पूर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वारणा नदीच्या पाण्याचा वेढा पडला असून गावाचा संपर्क तुटला आहे.

गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगत जनावरांसहित स्थलांतरित व्हायला सुरुवात केली असल्याची माहिती मिळत आहे. चांदोली धरण क्षेत्रातून सतत वारणा नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात येत असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळी आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...

Metro 3: मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ऑक्टोबरमध्ये

I phone Launch: बहुप्रतीक्षित आयफोन-16ची विक्री सुरु; आयफोन-16 सिरीजच्या खरेदीदारांमध्ये क्रेझ