महाराष्ट्र

Cyclone Biparjoy : मुंबईतील जुहू बीचवर ६ जण बुडाले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : बिपरजॉय या चक्रीवादळाने आता भयंकर रुप घेण्यास सुरुवात केली आहे. हे वादळ 15 जून रोजी गुजरातमधील कच्छ जिल्हा आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. परंतु, याचा परिणाम मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर दिसत असून उंच लाट उसळत आहेत. अशातच, मुंबईतील जुहू बीचवर सहा जण बुडाले आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतील किनारपट्टीवर दिसत येत आहे. जुहू बीचवर सहा जण समुद्रात गेले असता उंच लाटांमुळे सर्वजण वाहून गेले. उपस्थित लोकांनी तातडीने धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. यात दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, चार जण बेपत्ता असून बचावकार्य सुरू आहे. बिपरजॉयमुळे लाटा उसळत असल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहे.

दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मुसळधार पाऊस आणि वादळाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. वास्तविक, बिपरजॉय हे चक्रीवादळ धोकादायक बनले असून 15 जून रोजी ते पश्चिम किनारपट्टीवर पोहोचू शकते. बिपरजॉयमुळे मुंबईतील हवामान खराब होत असून विमान उड्डाणांचे वेळापत्रक बिघडले आहे.

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल

वंचितची विधानसभेची पहिली यादी जाहीर; पहिल्या यादीत 11 उमेदवारांचा समावेश