चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आता ते ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांच्या भरवशावर आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याला विकासाकडे नेणारे आणि नवे व्हिजन देणारे नेतृत्त्व आहे.
उद्धव ठाकरे हे आता जाती-पातीच्या राजकारणावर उतरले असून धर्माच्या आधारावर मते घेण्याचा त्यांचा डाव आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना मतांमधून झोडपल्याशिवाय राहणार नाही.उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्याविषयी ज्या भाषेचा वापर केला आहे, त्यातून त्यांनी स्वतःची मानसिक दिवाळखोरी दाखवून दिली.
यासोबतच ते म्हणाले की, त्यांच्या विभाजनकारी भाषेवर आमचा आक्षेप आहेच. भाजपा त्यांच्या विखारी भाषेला जशास तसं प्रत्युत्तर देईल. असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.