महाराष्ट्र

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Published by : Dhanshree Shintre

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यातील अनेक भागांमधून पाऊस जवळपास गायब झाला आहे. पण, राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामानासहित तुरळक पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे.

मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत 26 ते 29 सप्टेंबरदरम्यान जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. सोबतच नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत जोरदार अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते. तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होणार असून काही भागात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार 23 सप्टेंबरपासून पावसाचे दमदार कमबॅक होणार आहे. त्यातही 26 आणि 27 ला खान्देश, नाशिक, छ.संभाजीनगर व सभोंवतलातील परिसरात व 28 आणि 29 ला मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.

हवामान खात्याने आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेली अनेक दिवस विश्रांती घेतल्यानंतर अखेर कार पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. हवामान खात्याने आज पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असे म्हटले आहे.

Latur Accident: अंबाजोगाई-लातूर रोडवर भीषण अपघात; चार जण जागीच ठार

Mumbai High Court: मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं सोमवारी भूमीपूजन

वायू प्रदूषण आणि उष्णतेमुळे ब्रेन स्ट्रोकची प्रकरणे वाढली; जगात अशा लोकांची संख्या पोहोचली 1.19 कोटींवर

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा