महाराष्ट्र

केंद्र सरकार संघाच्या रिमोटवर… भूपेश बघेल यांचा नागपुरात आरोप

Published by : Lokshahi News

इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात काँग्रेसने देशभरात आंदोलन हाती घेतले आहे. यासाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

सध्या महागाईमुळे देशातील जनता त्रस्त आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रिमोटवर चालते. यामुळे आता संघानेच महागाई कमी करण्यासाठी पुढाकार घेत हस्तक्षेप करावा व केंद्राला सूचना करावी. यासाठीच आपण नागपुरात येऊन ही मागणी करत आहोत. माझा आवाज संघाच्या कानापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे, असा टोला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी लगावला आहे.

अ.भा. काँग्रेस समितीतर्फे महागाईविरोधात देशभरात जनजागरण केले जात आहे. याअंतर्गत भूपेश बघेल यांनी नागपुरात येत केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारने गेली सात वर्षे हिंदू- मुस्लीम, मंदिर- मशीद, अशा भावनिक मुद्यांवर घालवले. जनहिताच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच महागाईने उच्चांक गाठला आहे, असे बघेल म्हणाले.

Amit Shah : अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

अक्षय शिंदेचा मृतदेह जे. जे रुग्णालयात हलवण्याची शक्यता

Women's T20 WC 2024: आयसीसीने T20 विश्वचषकासाठी स्पेशल थीम सॉन्ग केले लॉन्च

Sharad Pawar: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; शरद पवारांचं ट्विट करत सवाल...

Chitra Wagh: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया