महाराष्ट्र

‘पहचान कौन?’ म्हणत मुख्यमंत्र्यावर टीका

Published by : Lokshahi News

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस विविध मुद्द्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत असतात. यावेळी अमृता फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.

तसेच जनतेलाच 'पहचान कौन?' असं म्हणत एक कोड घातलं आहे. "ओळखा कोण? एक राजा जो उंबरठा ओलांडत नाही, जनतेला भेट नाही आणि सत्य, कर्माच्या मार्गाने जात नाही. वसुलीशिवाय त्याचं काहीच काम होत नाही. महासाथीचा कहर तो सांभाळू शकत नाही आणि प्रगतीचं फूल ज्याच्या छायेखाली फुलत नाही" अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार; जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होणार?

Election Commission: राज्यात आजपर्यंत 991 उमेदवारांचे 1292 नामनिर्देशन पत्र दाखल

Rahul Gandhi नाराज? जागावाटपाबाबत काय म्हटले राहुल गांधी?

देवेंद्र फडणवीस सोडवणार मुंबईतील जागांचा पेच?

लहान मुलांचे कान टोचण्याच्या परंपरेमागील नेमक कारण काय? जाणून घ्या...