महाराष्ट्र

अंबादास दानवे यांची अमित शाह यांच्यावर जोरदार टीका म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अंबादास दानवे म्हणाले की, दिल्लीतून महाराष्ट्रात नेत्यांच्या फौजा पाठवायच्या तुम्ही, अन औरंगजेबाचे नाव आम्हाला, वा रे वा? विरोधकांशी तुमचे असलेले बोलणे, वागणे, राजकीय दबाव टाकणे ही औरंगजेबी वृत्ती आज कोण पोसते आहे हे देश बघतो आहे.

देशाच्या 'उद्योग पळवे' गँगचे व्हाईस कॅप्टन महाराष्ट्रात आले होते, इथल्या मातीची, लोकांसाठी झगडणाऱ्या माणसांना काही तरी नावं ठेवायचे, घालून पाडून बोलायचे हा यांचा रटाळ अजेंडा लोकसभेत आपटी खाऊनही कायम आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, राहिला प्रश्न संभाजीनगरचा, बेगडी समर्थकांनी जे २०१४-१९ दरम्यान केले नाही, ते आम्ही केले. ती चिकलठाणा विमानतळाच्या नावाची फाईल तुमच्या टेबलावर धूळखात पडली आहे. तेवढं होतं का बघा! असे अंबादास दानवे म्हणाले.

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी