मंगेश जोशी | जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणाचे 20 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदीत काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हातनूर धरणाचे आज सकाळी बारा दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले होते. मात्र पूर्णा नदीतून हतनूर धरणात पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी सात वाजता हतनूर धरणाचे 20 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे.हतनूर धरणातून तापी नदीपात्रात 34785 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदीत काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.