'कोकण सेनेचंच, फडणवीस-दादांचंही यावर शिक्कामोर्तब' रामदास कदम यांचं मोठं वक्तव्य

'कोकण सेनेचंच, फडणवीस-दादांचंही यावर शिक्कामोर्तब' रामदास कदम यांचं मोठं वक्तव्य

रत्नागिरी-कोकण शिवसेनेचीच आहे, हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शिक्कामोर्तब केल असल्याच मोठं वक्तव्य शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलं आहे.
Published by :
shweta walge
Published on

रत्नागिरी-कोकण शिवसेनेचीच आहे, हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शिक्कामोर्तब केल असल्याच मोठं वक्तव्य शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलं आहे. तसच लोकसभा निवडणुक निकालानंतर कोकणातून धनुष्यबाण हद्दपार झाल्याचं वक्तव्य करणाऱ्यांना रामदास कदम यांनी चपराक दिली.

कोकणातील जवळपास सगळ्या जागा एकनाथ शिंदे आणि मिळवल्या आहेत. लोकसभा निवडणुक निकालानंतर कोकणातून धनुष्यबाण हद्दपार झाल्याचं वक्तव्य करणाऱ्यांना रामदास कदम यांनी चपराक दिली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत प्रश्न पडला होता कोकणातून धनुष्यबाण गायब झालं होतं. मी त्याही वेळेला सांगितलं होतं. विधानसभेच्या निवडणुकीत कोकणाला झुकत माप मिळेल असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com