Ramgiri Maharaj : रामगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य प्रकरण; मुस्लिम समाज आक्रमक

रामगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य प्रकरण आणि या प्रकरणात आता मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील मुस्लिम समाज ठिकठिकाणी मोर्चा काढणार आहेत.

रामगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य प्रकरण आणि या प्रकरणात आता मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील मुस्लिम समाज ठिकठिकाणी मोर्चा काढणार आहेत. रामगिरी महाराजांना अटक करून कारवाईची मागणी जोर धरत आहे आणि यामुळे कायदा तसेच सुव्यवस्था बिघडू शकते असा पोलिसांचा गोपनीय अहवाल आहे.

याचपार्श्वभूमीवर बच्चू कडू व्यक्त होत म्हणाले, कोणता ही संत, कोणी पण राजकीय लोक असेल किंवा कोणता ही कार्यकर्ता असेल त्यांनी महापुरुष आणि जे दैवीरुप आहे, मग ते ईश्वर असेल, अल्लाह असेल, आपल्यासाठी देव असेल ज्यांच्या परिने लोकांची त्यांच्यावर प्रचंड श्रद्धा असते. मग दे प्रभु रामचंद्र असले किंवा मोहम्मद पैगंबर असले तरी त्यांच्यावर लोकांची श्रद्धा आहे. त्यांच्या व्यक्तिगत जीवनात जाऊन त्यांनी काय केल ते खरं आहे की, खोट आहे हे न तपासता बोलणं त्याल्या काही अर्थ नाही. जाणीवपुर्वक देशहिताचे हित न पाहता मुद्दाम कुठे तरी आपल नाव कसं मोठं होईल या प्रकारे बोलूण हिनवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com