मराठा आंदोलकाची आत्महत्या; मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

जालनातून मराठा आंदोलनासाठी मुंबईत आलेल्या कार्यकर्त्याने आत्महत्या केली आहे. सुनील बाबुराव कावळे असे त्याचे नाव असून वांद्रे पूर्वेत दोरीच्या साह्याने त्याने गळफास घेतला आहे.

मुंबई : जालनातून मराठा आंदोलनासाठी मुंबईत आलेल्या कार्यकर्त्याने आत्महत्या केली आहे. सुनील बाबुराव कावळे असे त्याचे नाव असून वांद्रे पूर्वेत दोरीच्या साह्याने त्याने गळफास घेतला आहे. यावरुन आता शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत आहे. अशातच, मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर येत आहे.

हे सरकारचं पाप आहे सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचं मनोज जरांगेंनी विधान केलं. सरकारला हे परवडणारं नाही. आम्ही हे बलिदान वाया जाऊ देणार नाही. आता आम्हाला तातडीनं आरक्षण दिलं पाहिजे, असंही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com