Prakash Ambedkar: जरांगेंनी जालन्यातून लोकसभा लढवावी, प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला

जारांगे पाटलांनी त्यांचा लढा राजकीय केला पाहिजे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी जारांगे पाटील यांना दिलाय. कुणबी संदर्भातील मागणी पूर्ण झाल्याचं दिसत आहे.
Published by :
Team Lokshahi

जारांगे पाटलांनी त्यांचा लढा राजकीय केला पाहिजे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी जारांगे पाटील यांना दिलाय. कुणबी संदर्भातील मागणी पूर्ण झाल्याचं दिसत आहे. आता गरीब मराठा यांचा प्रश्न शिल्लक राहिलेला आहे आणि तो शिंदे आयोगावर अवलंबून आहे असं सरकार म्हणत आहे. 20 तारखेला होणारा मसुदा काय आहे? ते अजून सरकारने सांगितलं नाही. त्यामुळे त्यात गरीब मराठ्यांचा प्रश्न आहे की नाही हे कळायला मार्ग नाही.

येत्या 20 दिवसात आचार संहिता लागण्याची शक्यता आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 80 सलापासून मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढलेल्या वेगवेगळ्या संघटनांना निझामी मराठ्यांनी जिरवून टाकल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत जालण्यातून जारांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी असा सल्लाही आंबेडकरांनी यावेळी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com