India Aaghadi Padayatra: महात्मा गांधी जयंतीनिमित्त इंडिया आघाडीची पदयात्रा

महात्मा गांधी जयंतीनिमित्त इंडिया आघाडीची मुंबईत पदयात्रा आहे. राज्यात महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

महात्मा गांधी जयंतीनिमित्त इंडिया आघाडीची मुंबईत पदयात्रा आहे. राज्यात महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. पदयात्रेमध्ये इंडिया आघाडीतील मोठे नेते सहभागी झाले आहेत. यावेळी नेते राजे टोपे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड देखील इंडिया आघाडीच्या या पदयात्रेत सध्या सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हुतात्मा चौकापासून ते मंत्रालय शेजारी असणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली असेल. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन असे हातात फलक घेत महाविकास आघाडीचे त्याचबरोबर इंडिया आघाडीचे नेते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com