पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. यावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही, याची खबरदारी घ्या, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
गोविंदा, दहीहंडी आणि उंच मानवी थर ही मुंबईची संस्कृती आणि ओळख आहे. ही ओळख टिकावी म्हणून प्रो गोविंदासाठी जिल्हा विकास नियोजन विभागातून दोन कोटींचा निधी देण्यात आला.
गेला आठवडाभर चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अशात चितमपल्ली येथे तलाव फुटल्याने तर पिंपळखुट येथे अंधारी नदीच्या पुराने प्रचंड मोठे नुकसान नागरिकांना सहन करावे लागले.