ताज्या बातम्या
रायगडच्या खरिवलीतील आदिवासी महिलांचा मतदानावर बहिष्कार
आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे.
भारत गोरेगावकर, रायगड
आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता रायगडच्या खरिवलीतील आदिवासी महिलांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचे पाहायला मिळत आहे. या वाडीवर पाणी टंचाईची समस्या गंभीर आहे. हा भाग मावळ मतदारसंघात येत असून आज तिथं मतदान होत आहे. त्या ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते.
त्यामुळे आज मतदानाच्या पार्श्वभूमीवर रायगडच्या खरिवलीतील आदिवासी महिलांचा मतदानावर बहिष्कार टाकला आहे.