Supriya Sule : इतिहास स्वत: मनापासून लिहिता येत नाही, इतिहास जो खरा आहे तोच लिहायचा असतो, तोच सांगायचा असतो
साताऱ्यात आज शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखे प्रदर्शनात ठेवली जाणार आहे. या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार, शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे की, वाघनखांबद्दल सरकारने प्रयत्न केला सरकारचे कौतुक आहे, आनंद आहे. पण इंद्रजीतदादा सारखं असं म्हणतात. त्यांचे असं म्हणणं आहे की, त्यांना म्युझियममधूनच पत्र आलेलं आहे. जिथून ही वाघनखं आली आहेत त्याच म्युझियमने पत्र लिहिलं आहे इंद्रजीत सावंत यांना की, ही वाघनखं नक्की ओरिजनल आहेत की नाही. हे माहित नाही.
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्यक्रमात खरे कधीतरी बोलावं आणि सांगावं महाराष्ट्राच्या जनतेला की ही वाघनख नक्की ओरिजनल आहेत का? कारण असं खूप अपेक्षेनं लोक तिथे जात आहेत. जे खरे आहे सत्य आहे इतिहास स्वत: मनापासून लिहिता येत नाही, इतिहास जो खरा आहे तोच लिहायचा असतो, तोच सांगायचा असतो. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.