ताज्या बातम्या
गायरान अतिक्रमणधारकांना राज्य सरकारने दिलासा द्यावा - आमदार हसन मुश्रीफ
गायरानमध्ये अतिक्रमणे केलेल्या नागरिकांच्या अतिक्रमणित जागांचे नियमितीकरण करून अतिक्रमणधारकांना राज्य सरकारने तातडीने दिलासा द्यावा.
सतेज औंधकर, कोल्हापूर
गायरानमध्ये अतिक्रमणे केलेल्या नागरिकांच्या अतिक्रमणित जागांचे नियमितीकरण करून अतिक्रमणधारकांना राज्य सरकारने तातडीने दिलासा द्यावा. कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमणे न काढण्याच्या सूचना प्रशासनाला तातडीने अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
दरम्यान अतिक्रमण नोटीस आलेल्या नागरिकांनी या नोटिसीला रीतसर आपण त्या ठिकाणी कधीपासून रहिवास करतो याची संपूर्ण माहिती द्यावी असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.