Raj Thackeray : महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे

राज ठाकरे हे आज सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published by :
Siddhi Naringrekar

राज ठाकरे हे आज सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.महाराष्ट्रात आगामी काळात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे. मात्र, त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना मणिपूर झालेलं हवंय की नकोय, असे राज ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com