बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस सतर्क

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस सतर्क

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

याच पार्श्वभूमीवर आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर पोलिसांच्या संरक्षण, सुरक्षा विभागाची विशेष बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने फेरआढावा घेण्याचे काम सध्या सुरु असून यामध्ये बाबा सिद्दिकी यांच्या प्रकरणानंतर कोणत्याही परिस्थिती सुरक्षारक्षकांना नियमावलीचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

यावेळी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले असून पोलीस सुरक्षा रक्षकांनी त्यांना अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत येणाऱ्या अडचणींची माहिती दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com