devendra fadnavis winter session
devendra fadnavis winter session Team Lokshahi

मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची...; फडणवीसांनी कर्नाटकला ठणकावले

कर्नाटकचे विधानपरिषदेचे आमदारांच्या दाव्यावरुन हिवाळी अधिवेशनातील राजकीय वातावरण चांगलेच तापले
Published on

नागपूर : कर्नाटकचे विधी मंत्री माधूस्वामी यांनी मुंबई केंद्रशासित करावी, अशी मागणी त्यांच्या विधानसभेत केली आणि मुंबईत २० टक्के कन्नड लोक राहतात, असा जावईशोधही लावला आहे. कर्नाटकचे विधानपरिषदेचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबई तर कर्नाटकचीच आहे, असा दावा केला आहे. यावरुन आज हिवाळी अधिवेशनातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही, असे ठणकावले आहे.

devendra fadnavis winter session
कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम करताहेत, सख्त ताकीद द्या - अजित पवार

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला विषय महत्त्वाचा आहे. मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही. त्या विधानांचा आम्ही निषेध करतो. विरोधी पक्षनेत्यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्रीय गृहमंत्र्यांना निषेधाचं पत्र पाठवू. गृहमंत्र्यांसमोर जे ठरलं आहे त्याचे उल्लंघन करणे हे दोन राज्यांमधील संबंधांसाठी योग्य नाही. हे त्यांना कडक शब्दांत सांगण्यात येईल. तसेच, तुमच्यासमोर जे ठरले होते त्याचे कर्नाटक पालन करत नसल्याचेही गृहमंत्र्याच्या निदर्शनास आणले जाईल. केंद्रीय गृहमंत्र्यांनीही कर्नाटकच्या अशा बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे, अशी विनंतीही करण्यात येईल, असेही फडणवीसांनी सांगितले.

devendra fadnavis winter session
अलिबाबा अन् 40 चोरांचे 25 घोटाळे बाहेर काढणार : संजय राऊत

मी पुन्हा सांगतो की, मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही. त्यावरचा कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही, असे फडणवीसांनी सभागृहात ठणकावून सांगितले. सरकार नव्हे तर सभागृह म्हणून निषेध असून या सभागृहाच्या भावना कर्नाटक सरकार, केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जातील, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री, आमदार, मंत्री सातत्याने महाराष्ट्राच्या भावना दुखावण्याचा व महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम करत आहेत. अमित शहा यांच्याशी चर्चा होऊनही सीमावासियांच्या भावनेला ठेच पोचवण्याचे काम कर्नाटक सरकारकडून वारंवार केले जात आहे. याबाबत गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त करा व सक्त ताकीद द्या, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com