Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshah

"Kashmir Files 2 काढून सध्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण हे स्पष्ट करावं"

संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

मुंबई : काश्मिरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर परिस्थिती बदलेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी भाजला घेरण्यास सुरुवात केली आहे. काश्मिरमधल्या हल्ल्यांवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजवर टीका केली आहे. कलम 370 हटवल्यानंतरही जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) तीच स्थिती कायम आहे.. काश्मिरी पंडितांच्या नशिबात पलायनच आहे. काश्मीर फाईल्स 2 हा चित्रपट काढावा आणि आताच्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे हे त्यात दाखवण्यात यावे असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Kanpur Violence : भाजप प्रवक्त्याच्या निषेधार्थ कानपूरमध्ये दोन गटांमध्ये जुंपली

गेल्या काही आठवड्यांत जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ होतेय. त्यावरुन विरोधीपक्षाकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काश्मीर फाईल्स या चित्रपटाचं कौतुक करणारे सध्या होणाऱ्या घटनांवर गप्प का आहेत असा सवाल काँग्रेसने केला आहे. टार्गेट किलींगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांमध्ये (Kashmiri Pandit) भय निर्माण झालं आहे. त्याकाळात असणाऱ्या भाजप (BJP) सरकारममुळेच ही परिस्थिती निर्माण झाली होती आणि आता सुद्धा 1990 सारखी परिस्थिती आहे असं काँग्रेसने म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com