राज्यात पुढील पाच दिवस काही भागात उष्णतेच्या लाटा

राज्यात पुढील पाच दिवस काही भागात उष्णतेच्या लाटा

राज्यात पुढील पाच दिवस काही भागात उष्णतेच्या लाटा असण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यात पुढील पाच दिवस काही भागात उष्णतेच्या लाटा असण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात उष्ण वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यातच राज्यात पुढील पाच दिवस काही भागात उष्णतेच्या लाटा तर काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच मुंबईसह कोकणातही उष्णतेच्या लाटसदृश स्थितीसह वातावरण दमट राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उकाड्याची तीव्रता कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com