ताज्या बातम्या
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी घोषणा करण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
दहिसर, मुलुंड पूर्व आणि पश्चिम, ऐरोली आणि वाशी, आनंदनगर या मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोलमाफी करण्यात आली आहे. विधानसभा आचारसंहितेआधी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकींच्या तारखांच्या घोषणा होऊ शकतात. आचारसंहिता कधीही लागू शकते. त्याच्याआधी राज्य मंत्रिमंडळात बैठकीतून महत्वाचे निर्णय घेतलं जात आहेत.
'या' पाच टोलनाक्यावर टोलमाफी?
दहिसर टोलनाका
मुलुंड-एलबीएस टोलनाका
वाशी टोलनाका
आनंदनगर टोलनाका
ऐरोली टोलनाका