ताज्या बातम्या
Bacchu Kadu : 20 वर्षात कुठल्याही पक्षाचा पाठिंबा घेतला नाही
अमरावतीमध्ये बोलताना बच्चू कडू म्हणाले की, 20 वर्षात कुठल्याही पक्षाचा पाठिंबा घेतला नाही.
अमरावतीमध्ये बोलताना बच्चू कडू म्हणाले की, 20 वर्षात कुठल्याही पक्षाचा पाठिंबा घेतला नाही. अनेक पक्ष पाठिंबा द्यायला आले पण पाठिंबा घेतला नाही. अजूनही सांगतो पाठिंबा दिला तरी घेत नाही.
आपल्याला कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाही. जोपर्यंत कार्यकर्ता आणि जनता आपल्यासोबत आहे तोपर्यंत कोणत्याही पक्षाची आपल्याला गरज नाही. नेमकं या कामाचं पुण्य काय भेटतं.
काय आशीर्वाद आहे. आज जे आमदार आहे बच्चू कडू हे तुमच्या आशीर्वादामुळे आहे. कारण तुम्ही जे काय मनातून दुवा दिली. म्हणून आम्ही एक एक पाऊल ताकदीने समोर टाकत आहे. ही तुमची पुण्याई आहे.