राजू शेट्टी यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; म्हणाले...

राजू शेट्टी यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; म्हणाले...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सुधाकर जाधव, जालना

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. राजू शेट्टी आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात दीड तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, मी आज त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्याकरता आलो होतो. परंतु चळवळीतील माणसं एकत्र आल्यानंतर तब्येतीचीच चौकशी केली असं म्हणणं चुकीचं होईल. सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयावर तसेच मराठी माणूस एकत्र आल्यावर गप्पा या होतच असतात. त्यापद्धतीने झाल्या.

आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहे की, जो महाराष्ट्रातला कष्ट करणारा वर्ग आहे, ज्याला घाम येतो अशांना एक आवाज देण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून चालू आहे. बघू एखाद्यावेळेस यश येईलसुद्धा. लवकरच निर्णय होऊन जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com