महाराष्ट्र
Raigad : रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी; सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
भारत गोरेगावकर, रायगड
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बऱ्याच ठिकाणची वाहतूक ही ठप्प झाली आहे. पुलाच्यावरुन पाणी जात असल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला असल्याची माहिती मिळत आहे.
पावसामुळे काही गावांची वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे. सखल भागात पाणी साचायला सुरवात झाली असून नागरिकांना सर्तक राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.