अमरावतीत आता शांतता तर दंगल करणाऱ्यांना सोडणार नाही -पालकमंत्री यशोमती ठाकूर

अमरावतीत आता शांतता तर दंगल करणाऱ्यांना सोडणार नाही -पालकमंत्री यशोमती ठाकूर

Published by :
Published on

त्रिपुरा हिंसाचाराचे अमरावतीत देखील हिंसक पडसाद उमटले होते. तर यात अमरावती बंद दरम्यान भाजपाच्या वतीने तोडफोड आणि जाळपोळ तसेच पोलिसांना मारहाण केल्याने अमरावतीत आज सकाळ पासून भाजप नेत्यांना अटक करण्याचे सत्र सुरू आहे.

अमरावतीमध्ये सर्वत्र शांतता असून काल व आज कुठल्याही प्रकारे गालबोट लागलं नाही, अशी माहिती अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. तर अमरावतीत संचारबंदी असल्याने नागरिकांना मूलभूत सुविधासाठी 2 ते 4 या वेळेला परवानगी देण्यात आली आहे. तसेच लवकरात लवकर परिस्थिती नार्मल होईल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. तर अमरावती शहरातील 4 ते 5 हजार पोलीस वगळता राज्य राखीव दल पोलीस बंदोबस्तसाठी तैनात असल्याचे देखील त्यांनी सांगितले तर, दंगल करणाऱ्यांना कोणालाही सोडणार अशी माहिती सुद्धा यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com