‘अमृता वहिनी म्हणजे अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन’;रुपाली चाकणकरांचे प्रत्युत्तर

‘अमृता वहिनी म्हणजे अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन’;रुपाली चाकणकरांचे प्रत्युत्तर

Published by :
Published on

उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने 'महाराष्ट्र बंद' पुकारला आहे. या बंद वर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. तर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील सरकारला जोरदार टोला लगावला आहे. याला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र बंद संदर्भात एक ट्विट केले. त्यातून त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. "कोणी मला माहिती देऊ शकेल का. आज वसूली चालू आहे की बंद?," असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. यावेळी महाराष्ट्र बंदवरून अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

दरम्यान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी खोचक शब्दात अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. "वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो? संवेदनाहीन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी.",असे ट्विट करत रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com