“काही लोक पाण्यात भिजतात आणि निवडणूक जिंकतात”

“काही लोक पाण्यात भिजतात आणि निवडणूक जिंकतात”

Published by :
Published on

काही लोक पाण्यात भिजतात आणि निवडणूक जिंकतात, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावलाय. जालना जिल्ह्यातल्या वाटूर फाटा येथे कुणबी शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भर पावसात पटोलेंची बैलगाडी रॅली काढण्यात आली. त्यावेळी शेतकऱ्याच्या पोराला पावसानं ओलं झाल्यावर काय फरक पडतं, तो घामानं तर रोजच ओला होतो, असं त्यांनी म्हटलं.

त्यामुळं काही लोक येतात आणि पावसात भिजतात अन निवडणूक जिंकतात, असा टोला पटोले यांनी लगावलाय. दरम्यान, कुणाला काय कुटनिती करायची ती त्याने करावी. आम्ही कुणाच्या पक्षात हस्तक्षेप करणार नाही, असं पटोले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com