Manoj Jarange Patil : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार
मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा सुटला अखेर सुटला आहे. सुधारित अध्यादेश सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत.
आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार आहेत. जरांगे पाटलांची विजयी सभा आज वाशीमध्ये पार पडणार आहे. मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांची वाशीत होणाऱ्या विजयी सभेत एक-दोन नव्हे तर तब्बल सात जेसीबीच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्यांवर फुलांची उधळण करण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, हा विजय संपूर्ण मराठा समाजाचा आहे. सरकारने सगेसोयऱ्यांबाबत जीआर दिला. आमच्या विजयाचं श्रेय सर्व मराठा समाजाला. केसेस मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. मुंबईकडे आलो नसतो तर आरक्षण मिळालं नसते. मराठा समाजासाठी भविष्यातही लढा देत राहणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अध्यादेश घेणार. अंतरवालीत बैठक घेऊन विजयी सभेची तारीख सांगणार. विजयी सभा लवकरच घेणार. मराठा समाजाचा हा ऐतिहासिक विजय आहे. असे जरांगे पाटील म्हणाले.