तीन तिघाडा काम बिघाडा; नाना पटोलेंनी कोणावर केली टीका ?

सध्याचे राज्य सरकार असंवैधानिक असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे, त्याचबरोबर तिन तिघाडा काम बिघाडा असं सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
Published by :
Team Lokshahi

मुंबई: सध्याचे राज्य सरकार असंवैधानिक असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे, त्याचबरोबर तीन तिघाडा काम बिघाडा असं सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्य पाच वर्षे मागे गेल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. मलाईच्या खात्यासाठी संघर्ष सुरू असल्याचं म्हणत त्यांनी खातेवाटपाच्या चर्चांवर हल्लाबोल केला आहे. मुंबई सारखं शहर घाण करून ठेवल्याचं म्हणत बीएमसीची 25 वर्षांची चौकशी भाजपनं करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com