Raj Thackeray : महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी फोडाफोडीचे राजकारण केलं

Raj Thackeray : महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी फोडाफोडीचे राजकारण केलं

नागपूरमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नागपूरमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे म्हणाले की, जातीयवाद, पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण या सगळ्या गोष्टींना कारणीभूत फक्त एकटं शरद पवार आहेत.

महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी फोडाफोडीचे राजकारण केलं. कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली. जातीचं विष देखिल शरद पवार यांनी कालवलं. या सगळ्या गोष्टी ज्या सुरु झाल्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरु झाल्या.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, असे महाराष्ट्र याच्याअगोदर कधीच नव्हता. हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे. हा विषय फक्त काय राजकारण, विधानसभा, लोकसभापुरता राहिला नाही हा घराघरात शिरलेला विषय आहे. असे राज ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com