Kolhapur : कोल्हापूरवर पुन्हा महापुराचे संकट; धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला
सतेज औंधकर, कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली असून कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरलं असून राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
राधानगरी धरणातून 11,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. 100% भरल्याने राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.
राधानगरी धरणातून 11,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. 100% भरल्याने राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. पंचगंगेची पाणीपातळी ही 43 फूट 4 इंचांवर गेली असून तुळशी आणि दूधगंगा धरणातूनही विसर्ग वाढवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातले 70 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदी अद्यापही धोका पातळीवर वाहत आहे.