महाराष्ट्र
बदलापूर अत्याचार प्रकरण; खासदार बळवंत वानखडे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.
बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. बदलापूरच्या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांकडून बदलापूर स्टेशनवर रेलरोको आंदोलन देखील करण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर आता बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बळवंत वानखडे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रातच अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. मग बदलापूर असेल, अकोला असेल, किंवा अन्य ठिकाणी असेल या सातत्याने महिलांवर, मुलींवर अत्याचाराच्या घटना खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत.
राज्याचे गृहमंत्रालय याकडे दुर्लक्ष करत आहे. गृहमंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी समजून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. असे बळवंत वानखडे म्हणाले.