मुंबईत 15 दिवस जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी शहरात 23 जानेवारीपासून 6 फेब्रुवारीपर्यंत पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मुंबईत मराठा मोर्चा धडकणार आहे तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून २८ जानेवारीपर्यंत पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे हे आदेश बजावले आहेत. त्यामुळे २३ जानेवारी मध्यरात्रीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत १५ दिवस मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.