जयंत पाटील म्हणाले, “2024 ला पवार साहेबांना ‘ही’ भेट द्यायची आहे…”

जयंत पाटील म्हणाले, “2024 ला पवार साहेबांना ‘ही’ भेट द्यायची आहे…”

Published by :
Vikrant Shinde
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) हे नेहमीच कार्यकर्त्यांमध्ये एक उर्जा निर्माण करण्याचं काम करत असतात. जयंत पाटलांनी तळेगाव (Talegaon) येथे आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना 2024 च्या निवडणूकीच्या (2024 Elections) तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.


"आपल्या पक्षाकडे मुख्यमंत्री करण्याची संधी होती. पण, एकत्रीत काम करायचं असल्याने आपण ती सोडली. पण, 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष बनवायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आमदार निवडून आणून शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना भेट द्यायची आहे" असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न असल्याचे आता दिसते आहे.


कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे जयंत पाटलांचे आवाहन:
"2024 च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेट द्यायची आहे. राष्ट्रवादी महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे. त्यामुळे आत्तापासून तुम्ही कामाला लागा" असे आवाहन वजा आदेश मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. तळेगाव येथे आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाटील बोलत होते.


'महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण काम करत आहेत. हे तरुण चांगले काम करत आहे. एकदा आपण महाराष्ट्रात 72 आमदारांच्या संख्येवर पोहोचलो होतो. राज्यात मुख्यमंत्री करण्याची संधी आपल्या पक्षाला आली होती. पण सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी ती संधी आपण सोडल्याचे' पाटील म्हणाले. "2024 ला आपण 114 जागा लढवू किंवा 120 जागा लढवू आघाडी ज्यावेळी होईल त्यावेळी निर्णय होईल. पण जेवढ्या जागा लढवू तेवढ्या सगळ्या जागा निवडून आणण्याची जिद्द आपण बाळगली पाहिजे. आजही पवारसाहेब 24 तास काम करत आहे. त्यामुले 2024 ला सगळ्यात मोठं गिफ्ट द्यायचं आहे" असं पाटील म्हणाले.


विरोधकांकडून महाराष्ट्र सरकारबद्दल चुकीचा गैरसमज पसरवण्याचे काम सुरु असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. केंद्र सरकारच्या विरोधात जो माणूस बोलतो त्याला अडचणीत आणण्याचे काम सुरु आहे. पाच लाख लोकांमधून निवडून येणारे नेते नवाब मलिक आहेत, ते सगळे सहकार्य करायला तयार आहेत. त्यांना आत घालण्याचे काम केले जात असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com